(मन्या त्याच्या ड्रायफ्रु़टच्या दुकानात बसलेला असतो.)

(तिकडून जन्या येतो आणि विचारतो.)

जन्या : बदाम खाल्ल्यानं काय होतं?

मन्या : बदाम खाल्ल्यानं बुद्धी तेज होते.

जन्या : खरंच बुद्धी तेज होते?

मन्या : मला सांग एक किलो तांदुळात किती तांदुळाचे दाणे असताता?

जन्या : माहीत नाही.

मन्या : हे बदाम खाऊन बघ.

मन्या : आता मला सांग एका डझनात किती केळी असतात?

जन्या : बारा.

मन्या : बघितलंस बुद्धी तेज झाली की नाही?

Story img Loader