मन्यानं जन्याला विचारलं, “तुझ्या मुलीचा साखरपुडा २ वर्षांपूर्वी झाला होता ना, मग अजून लग्न कसं नाही झालं?” जन्या : हे सर्व त्या मुलामुळे होतंय. मुलगा वकील आहे, लग्नाची तारीख जशी जवळ येते, तो काही ना काही बहाणा करून तारीख पुढे ढकलतो.