राज्यातील शाळा सुरू करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर राखणे, दर दोन तासांनी विद्यार्थी हाताळत असलेल्या वस्तू निर्जंतुक करणे असे निकष पाळण्याचे आव्हान राज्यातील शाळांपुढे राहणार आहे.

राज्यातील शाळा जूनपासून सुरू करण्याची तयारी शिक्षण विभाग करत आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याचे, निकष पाळण्याचे आव्हान शाळांना पेलावे लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दीड मिटर अंतर राखण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेच्या बसऐवजी पालकांनीच शाळेत सोडावे. प्रत्येक शाळेने प्रवेशदारावर विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्याची सुविधा उपलब्ध करावी. एकाच प्रवेशदारावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेरच्या कुणालाही शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तापमान अधिक असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात यावे. विद्यार्थी शाळेच्या वेळेत आजारी पडल्यास त्यांच्यासाठी शाळेतच स्वतंत्र खोली असावी. त्याचप्रमाणे संगणक, बटणे, जिन्याचे कठडे, इतर साहित्य अशा मोठय़ा प्रमाणात हाताळल्या जाणाऱ्या गोष्टी दर दोन तासांनी निर्जंतुक करण्यात याव्यात. रोज वर्गाची सुरुवात स्वच्छतेच्या सवयी, काळजी कशी घ्यावी अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यापासून व्हावी. प्रयोगशाळा, ग्रंथालये येथील वावरावर निर्बंध आणावेत. वर्ग सोडून अन्यत्र कोणत्याही ठिकाणी काही उपक्रम घ्यायचा असल्यास तो परिसर उपक्रम घेण्याआधी आणि नंतर निर्जंतुक करण्यात यावा, अशा सूचना भारतीय गुणवत्ता परिषदेने दिल्या आहेत. विविध क्षेत्रातीलतज्ज्ञ, उद्योजक यांचा समावेश असलेली ही शासनाची स्वायत्त सल्लागार संस्था आहे. यापुढील काळात ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाचे पर्यायसुद्धा मोठय़ा प्रमाणावर परिणामकारकरीत्या उपयोगात आणावेत. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम कमी करणे, विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड देण्यात यावे, ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय सक्षम करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. विभागातील अधिकाऱ्यांबरोबर ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली.

Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
Letter of intent of unauthorized school in Dharavi cancelled
धारावीतील अनधिकृत शाळेचे इरादापत्र रद्द, शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन होणार
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Mumbai Threat
Bomb Threat To School : मुंबईत खासगी शाळेत बॉम्बची धमकी; पोलिसांकडून परिसराची झडती
Unauthorized school, education officer,
अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास आता शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई
Story img Loader