मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मुंबई उपनगरांतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) एकूण १,३१९ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. बोरिवली, वडाळा, अंधेरी आणि ताडदेव असे मुंबईत एकूण चार आरटीओ आहेत. यापैकी ताडदेव आरटीओ वगळता तिन्ही आरटीओ मिळून ७०५ दुचाकींची आणि ६१४ चारचाकींची गुढीपाडवा मुहूर्तावर नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागत असल्याने ही गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आधीच वाहन दारात आणण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे बुधवारी गुढीपाडव्याऐवजी मंगळवारी जास्त संख्येने वाहन खरेदीची स्थिती होती.  यंदाच्यावर्षी गेल्या दोन दिवसांत अंधेरी आरटीओत सर्वाधिक म्हणजे ४७२ वाहनांची नोंद झाली आहे. बोरिवलीत आरटीओत ४३० आणि वडाळा आरटीओत ४१७ वाहनांची नोंद करण्यात आलेली आहेत. अंधेरी आरटीओमध्ये मंगळवारी २४९ दुचाकी आणि १६७ चारचाकींची नोंदणी झाली. तर, बुधवारी ४१ दुचाकी आणि १५ चारचाकींची नोंदणी झाली. बोरिवली आरटीओमध्ये मंगळवारी १६९ दुचाकी आणि  २०२ चारचाकींची नोंदणी झाली. तर, बुधवारी २१ दुचाकी आणि ३८ चारचाकींची नोंदणी झाली. तर वडाळा आरटीओमध्ये मंगळवारी २०९ दुचाकी आणि १८४ चारचाकींची नोंदणी झाली असून बुधवारी १६ दुचाकी आणि ८ चारचाकींची नोंदणी झाली. यामध्ये ताडदेव आरटीओकडून मुहूर्ताची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.