मुंबई: म्हाडामधील १४०० कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे कवच लाभले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून जीवन विमा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मिळणार आहेत. तसेच कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मिळणार आहे.

मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना जीवन विम्याची योजना लागू व्हावी यासाठी म्हाडा कर्मचारी संघटना आणि प्रशासन प्रयत्नशील होते. या प्रयत्नास यश आले असून बँक ऑफ महाराष्ट्रने म्हाडाची मागणी मान्य केली आहे. या बँकेत वेतनाची खाती असलेल्या १४०० कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे कवच देण्यात आले आहे.

Shinde announces financial aid to Sant Tukaram Maharaj descendant
देहू: एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत; ३२ लाखांचं कर्ज…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
Death due to GBS disease reported in a private hospital in Pune print news
‘जीबीएस’ बळींची संख्या सहावर! पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यूची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १७३ वर
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
readers reaction on different lokrang articles
लोकमानस : मध्यमवर्ग हवा, पण शेतकरी नको?
Three more gbs patients died Two deaths reported in Pune and one in Pimpri Chinchwad
पुण्यास पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’मुळे आणखी तिघांचा मृत्यू; राज्यातील रुग्णसंख्या १४० वर
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती

हेही वाचा… पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लक्ष्य गाठताना महानगरपालिकेची दमछाक; दोन लाख फेरीवाले आणायचे कुठून

कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबियांना पाच लाख रुपये मिळणार असून कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० लाख रुपये मिळणार आहे. त्याचवेळी अंशत कायमस्वरूपी अंपगत्व आल्यास २० लाख रुपये तर हवाई अपघातात मृ्त्यू झाल्यास एक कोटी रुपये मृत कर्चमाऱ्याच्या कुटुबाला मिळणार असल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे वित्त नियंत्रक अजयसिंग पवार यांनी दिली. कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader