मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुम गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीत १६ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पात्र विजेत्यांनी न्यायालयात धाव घेतली असून घरांच्या किमतीत केलेली वाढ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आज, बुधवारी सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीकडे पात्र विजेत्यांचे लक्ष लागले आहे.

कोकण मंडळाने २०१८ च्या सोडतीतील बाळकुम प्रकल्पातील १२५ घरांसह २००० वर्षातील लाभार्थ्यांसाठीच्या ६९ घरांच्या किंमतींमध्ये १६ लाख रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे, या घरांची किंमत ४३ लाख रुपयांवरून ५९ लाखावर पोहोचली आहे. कोकण मंडळाने व्याज, पाणीपुरवठा सुविधा, वाहनतळ आणि मेट्रो उपकराचा भार टाकल्याने घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ रद्द करावी अशी मागणी या विजेत्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, कोकण मंडळाने ही मागणी फेटाळून लावून तात्पुरते देकार पत्र पाठवून चार टप्प्यात घराची रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. २५ टक्क्यांचा पहिला हप्ता जवळपास सर्व विजेत्यांनी भरला आहे. तर आता ३१ जानेवारीपर्यंत ५० टक्के रक्कम भरायची आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम घरांना निवासी दाखला मिळाल्यानंतर भरायची आहे.

venus and sun yuti 2025
शुक्रादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; १२ महिन्यानंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Manohar joshi Sushil Modi Bhulai bhai
मनोहर जोशी ते सुशील मोदी; भाजपा व एनडीएशी संबंधित कोणकोणत्या नेत्यांना मिळाला पद्म पुरस्कार?
Ranji Trophy Indian Players Rohit sharma rishabh pant fail in 1st Match
Ranji Trophy: टीम इंडियाचे स्टार घरच्या मैदानावरही नापास; गिल, पंत, यशस्वी एकेरी धावा करुन तंबूत
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे

हेही वाचा – राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली, पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना

हेही वाचा – “केस कापून येतो, माझ्यासाठी…” आईला सांगितलेले शब्द ठरले शेवटचे! मुंबईत भरधाव बाईकवरचा ताबा सुटल्याने दोन तरूणांचा मृत्यू

कोकण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घरांचा ताबा देऊ असे सांगत रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रकल्पातील वाहनतळाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवासी दाखला मिळाल्यानंतरच उर्वरित तीन टप्प्यांतील रक्कम घ्यावी, अशी मागणी विजेत्यांनी कोकण मंडळाकडे केली आहे. मात्र, ही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे, काही विजेत्यांनी एकत्र येऊन आता न्यायालयात धाव घेतल्याची माहिती एका विजेत्याने दिली. १६ लाख रुपयांची वाढ मागे घ्यावी आणि निवासी दाखला मिळाल्यानंतरच घराची रक्कम भरून घ्यावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी एक सुनावणी झाली असून आज बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.

Story img Loader