मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दरसाल डझनाहून अधिक बँकांना परवाना गमवावा लागून, मार्च २०२४पर्यंत गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल ६० नागरी सहकारी बँका नामशेष झाल्या आहेत. ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचे दिसत असले तरी उद्दाम बँकचालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडली आहे. उलट सामान्य सभासद, ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचे चित्र आहे. सहकाराची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात, २०२४ सालात ४९६ नागरी बँका कार्यरत होत्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडे (डीआयसीजीसी) मार्च २०२४ अखेर नोंदणीकृत बँकांची संख्या हे दर्शविते. २०२४ मध्ये तीन सहकारी बँकांचा परवाना रद्दबातल केला गेला, ज्यात सिटी को-ऑपरेटिव्ह बँक आणि जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेचा समावेश आहे. त्या आधी २०१९-२० ते मार्च २०२४ पर्यंत पाच वर्षांत ६० हून अधिक नागरी सहकारी बँकांचा परवाना रद्द केला गेला किंवा त्यांचे अन्य बँकेत विलीनीकरण होऊन त्या नामशेष झाल्या. एकट्या २०२२-२३ मध्ये देशभरात १७ नागरी सहकारी बँका बुडाल्या. ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. सध्याच्या घडीला रिझर्व्ह बँकेद्वारे कलम ‘३५ अ’अंतर्गत निर्बंध लागू असलेल्या नागरी बँकांची संख्या ४०च्या घरात आहे. नियामक म्हणून रिझर्व्ह बँकेकडून वर्षागणिक शेकडो बँकांवर आर्थिक दंड लावला जाण्याची कारवाई होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा