लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणा दरम्यान असणाऱ्या पुल क्रमांक ९० च्या ६२ वर्षे जुने स्टीलच्या तुळया बदलण्यात आल्या. हे काम करण्यासाठी साधारणपणे ८ तासांचा कालावधी लागतो. मात्र, पश्चिम रेल्वेने हे काम ६ तासांत यशस्वीपणे पूर्ण केले. स्टीलच्या तुळयाऐवजी पोर्टलँड स्लॅग सिमेंट (पीएससी) स्लॅब बदलण्यात आला.

traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
bike rider looted at sangam bridge area
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना
Wardha, mobile phone theft, recovery, police, lost phones, cyber cell, investigation, stolen mobiles, mobile return event, CEIR portal, wardha news, latest news,
वर्धा : ३३ लाखांचे मोबाईल सापडले, मालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले…
case against private classes teacher for beat six year old girl in dombivali
डोंबिवलीत सागावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या खासगी शिकवणी चालिकेविरुध्द गुन्हा
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
Liquor bottles, Dombivli East Railway Station,
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक पिशव्या, दुर्गंधीने पादचारी हैराण
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण

आणखी वाचा-कोकण रेल्वे करणार केनियातील रेल्वेची देखभाल-दुरुस्ती

विरार – वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक ९० वर तुळई बदलण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेतला होता. शुक्रवारी रात्री १०.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत ब्लॉक होता. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल रद्द होत्या. तर, काही लोकल अंशत: रद्द केल्या. त्यानंतर, १९६२ साली उभारण्यात आलेल्या पुलाच्या तुळया बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. ब्लॉकच्या संपूर्ण कालावधीचा वापर करून पायाभूत सुविधा, देखभाल-दुरूस्तीचे काम केले गेले आहे. त्यामुळे प्रवाशांचा लोकल, रेल्वेगाड्यांचा प्रवास अधिक सुरक्षित झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.