मुंबई : राज्यात विविध आजारांनी या वर्षभरात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक ३९ जणांचा मृत्यू झाला असून डेंग्यूने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जलजन्य आजारांमुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे.

पावसाळ्यात पसरणाऱ्या जलजन्य आजारांबरोबरच अन्य साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असतात.

College student sexually assaulted and threatened to go viral and demanded extortion
मुंबईः लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
ED seized assets worth Rs 43 crore 52 lakh in case of defrauding bank group
१,४३८ कोटींचे बँक फसवणूक प्रकरण: ईडीकडून ४३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
ST Corporation in profit after nine years
नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात
Central Railway
Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

हे ही वाचा…मुंबईः लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी

साथीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल डेंग्यूमुळे १७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ग्रामीण भागामध्ये १३ तर शहरी भागामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. जलजन्य आजारांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अतिसाराने पाच जणांचा, कॉलराने तीन जणांचा तर गॅस्ट्रो, कावीळ, लेप्टो व स्क्रब टायफसने प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.