लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवत असून त्या अंतर्गत ७३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधीत वाहने जप्त करण्यात आली आहेत. भादंवि कलम ७१८ अंतर्गत संबंधीत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
High Court question to State Government Municipal Corporation about making hawkers free street
पंतप्रधानांसाठी पदपथ मोकळे होतात; तर सर्व सामान्यांसाठी का नाही? उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, महापालिकेला संतप्त प्रश्न
new scheme for poor women in maharashtra
महाराष्ट्रात लाडकी बहीण; मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये
thieves beat up the employees and stole the catering materials
मुंबई : कर्मचाऱ्यांना मारहाण करून चोरट्यांनी पळवले केटरिंग साहित्य
Cracks in subway at Chunabhatti fear of accident
चुनाभट्टी येथील भुयारी मार्गाला भेगा, दुर्घटनेची भीती
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?
oxygen Scam in Corona Give permission for the action of employees after considering everything says HC
करोना काळातील प्राणवायू प्रकल्प घोटाळा : सारासार विचार करून कर्मचाऱ्यांवीर कारवाईसाठी मंजुरी द्या, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेला काही वाहनचालक त्यांची वाहने विरूद्ध दिशेने चालवित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. असे वाहनचालक वाहने विरूध्द दिशेने चालवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करून वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने अशा प्रकारे विरूध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना वाहतूकीची शिस्त लागावी म्हणून दिनांक १५ जून पासून २३ जूनपर्यंत मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवली.

आणखी वाचा-२० टक्के सर्वसमावेश गृहयोजना… आता म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरे घेणार

या मोहिमेत विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याप्रकरणी ७३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि ७१८ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संबंधीत वाहने जप्त केले आहे. यावेळी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून शिस्तबध्द व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.