मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे, वर्षभरानंतर चव्हाण यांची कारागृहातून सुटका होणार आहे. आदित्य ठाकरे याचे निकटवर्तीय चव्हाण यांना १७ जानेवारी २०२४ रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी अटक केली होती. तेव्हापासून ते अटकेत होते. सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावतयानंतर चव्हाण यांनी जामीनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात होता. दुसरीकडे, चव्हाण यांनी अटकेला उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने चव्हाण यांची याचिका मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला. चव्हाण यांनी अटकेला आणि त्यानंतर सुनावण्यात आलेल्या कोठडीला आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा