मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य शिक्षण मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल अलीकडेच ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. आरक्षित कोट्याअंतर्गत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पनाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु सध्या सदर सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्या ‘आपले सरकार – महाऑनलाइन’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) या सरकारी संकतेस्थळावरील तांत्रिक गोंधळाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास संबंधित महाविद्यालयीन प्रवेशाची संधी हुकते का? अशी चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा