मुंबई : देशातील पहिले कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान समूह विकास (क्लस्टर) केंद्र राज्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे धोरण महिनाभरात जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळातीलप्रदूषित पाण्यावर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया करणारे प्रकल्प डोंबिवली, तळोजा आणि तारापूर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर सामंत यांनी सांगितले की, दौऱ्यात राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध कंपन्या आणि शिष्टमंडळांसमवेत १३ बैठका झाल्या.

त्यात येणाऱ्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक आणण्याबाबत चर्चा झाली असून काही नवीन प्रकल्प उभारण्याबाबत कंपन्यांनी स्वारस्य दाखविल्याचे सामंत यांनी सांगितले.  कोकणचे सुपुत्र अजित जावकर ऑक्सफर्ड विद्यापीठातील कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानचे संचालक असून त्यांचा कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील अनुभव दांडगा आहे. त्यांनी देशातील पहिले कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञान समूह विकास केंद्र पुणे, नाशिक अथवा छत्रपती संभाजी नगरात उभारण्यास स्वारस्य दाखविले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Mastercards worlds largest state-of-the-art technology center in Pune
मास्टरकार्डचे पुण्यात जगातील सर्वांत मोठे आधुनिक तंत्रज्ञान केंद्र; तब्बल सहा हजार जणांना रोजगाराची संधी
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
elon musk Humanoid Optimus Robot price
Elon Musk Optimus Robot: रोबोट घरातलं सर्व काम करणार, एलॉन मस्कच्या या यंत्रमानवाची किंमत ऐकून हैराण व्हाल
Maharashtra State Government Directorate of Archeology and Museums Recruitment for the Vacant
राज्यात कंत्राटी नोकरभरती सुरूच… आता १०९ पदांचे काम कंत्राटी तत्त्वावर…
The use of artificial intelligence AI technology is also starting in the construction sector Pune print news
‘एआय’ची अशीही कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला कळेल संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक
venus mission isro
काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट
Pimpri-Chinchwad cameras AI technology,
आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पिंपरी-चिंचवडवर नजर, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५७० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे
lokmanas
लोकमानस: घोषणांनी, वायद्यांनी राज्याचा विकास होईल?