मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल, रेल्वेगाड्यामधून मोठ्या संख्येने विनातिकीट प्रवासी प्रवास करीत असून त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहे. या तक्रारींची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने विविध तपासणी अभियान राबवून एप्रिल ते जून या तीन महिन्यात ७.८४ लाख विनातिकीट प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून ५२.१४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा – Worli Hit and Run Case : २३ वर्ष वय असतानाही मिहीर शाहला मद्य का देण्यात आलं? पब व्यवस्थापनाने सांगितले कारण

property dispute, Sumit Wankhade, Wardha SP, family
VIDEO : हे काय? डीआयजी तत्काळ हजर आणि दोन शिपाई निलंबित, ठाणेदार बदलीवर…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Transport Minister Pratap Sarnaik urged creating role model for sustainable environment friendly development taking place at open space of ST
ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार
ST contract bus tender cancelled
एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Scam in contract bus process Inquiry committee recommends to Chief Minister to cancel tender Mumbai new
एसटी बस निविदेत घोटाळा नव्याने प्रक्रिया राबविण्याची शिफारस; मुख्यमंत्र्यांचे निर्णयाकडे लक्ष

हेही वाचा – मुंबई : एक कोटींच्या सोन्याची लगड घेऊन नोकर पसार

मुंबई उपनगरीय विभागात विनातिकीट प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या १४.६३ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी आणि प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. लोकल, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि सुट्टीकालीन विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जून या कालावधीत तिकीट तपासणी करून ५२.१४ कोटी रुपये दंड वसूल केला. तर, जून २०२४ मध्ये आरक्षित न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या २.२५ लाख विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करून १४.१० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३ हजार प्रवाशांचीही धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून ४३.६४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

Story img Loader