लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विना हेल्मेट दुचाकी चालविणे, भरधाव वाहने चालवून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, नशा करून वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करण्यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे भीषण अपघात घडतात. त्यात अनेकांचा मृत्यू होत असून आणि अनेकजण जखमी होतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत, म्हणजेच २०२३-२४ या वर्षात परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या एकत्रित कारवाईतून २,२६३ वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले आहे.

construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
banks In solapur deducting money from amount deposit under ladki bahin yojana of beneficiary women
लाडकी बहीण’ लाभाची रक्कम परस्पर वळती करण्याचे प्रकार
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
Lateral Entry, Lateral Entry news,
‘लॅटरल एण्ट्री’ची पद्धत राबवायचीच असेल तर…
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Police deployment, badlapur, Rumors
बदलापूरातील चिमुकलीच्या प्रकृतीची अफवा अन् रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आवाहन
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

मुंबईत सर्रासपणे विना हेल्मेट दुचाकी चालवणे सुरू आहे. यासह सिग्नल मोडणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहतुकीतून प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे, भाडे नाकारणे असे प्रकार घडत असतात. यावर ठोस कारवाई होत नसल्याने, वाहनधारक बिनधास्तपणे नियमांचा भंग करून वाहन चालवतो. मात्र, २०२३-२४ या वर्षात परिवहन विभागाने ठोस कारवाई करत वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले. त्यासह गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० रिक्षा-टॅक्सी वाहनांची तपासणी केली असता, यात ३,४०० रिक्षा-टॅक्सी वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून ६१.०५ लाखांची दंडवसुली केली. तर, ८५८ प्रकरणी परवाना व अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले.

आणखी वाचा-नालेसफाईची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

तसेच रिक्षा-टॅक्सीमधून मालवाहतूक करणाऱ्यांची १,६२५ प्रकरणांची नोंद झाली. यातून २९.७४ लाखांचा दंड वसूल केला. तसेच ६०१ प्रवासी बसची तपासणी केली असता, अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी १८५ दोषी वाहने आढळून आली. त्यांच्याकडून ५६.२६ लाखांची वसुली करण्यात आली. तसेच अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शालेय बस आणि इतर वाहने असे एकूण १,७९३ वाहनांची तपासणी केली असता, यात ३३५ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून १४.०२ लाख रूपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.