शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी १५ दिवसात सरकार कोसळणार असल्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बंडखोरांवर बोलताना “आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. या गल्लीगुंडांना लोक घरी बसवतील ही मला खात्री आहे,” असं मत व्यक्त केलं.ते रविवारी (२३ एप्रिल) वरळीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सरकार कोसळणार असल्याच्या संजय राऊतांच्या दाव्याविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रासह देशभरात ५० खोके, एकदम ओके हे सर्वांना माहिती झालं आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात फार वेळ वाया घालवायला नको. लोकांची कामं महत्त्वाची आहेत. देशात आणि राज्यात लोकशाही संपायला लागली आहे असं वाटत आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे आणि शिवसेना नेत्यांना का भेटले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट का घेतली?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Chandrashekar Bawankule statement in Pimpri after Delhi Assembly elections
“केजरीवाल, काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु-धु धुतले”, दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री- चंद्रशेखर बावनकुळे
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
लाडक्या बहिणींची महायुतीकडून फसवणूक; दिलेली मते परत घेणार का, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Uday Samant claims that Thackeray faction MP Shiv Sena is in touch with Shinde faction
उदय सामंत ‘मिशन टायगर’वर ठाम, म्हणाले दहा ते पंधरा आमदार…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका

“सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत”

“बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढत आहे. सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. यावर सत्ताधाऱ्यांपैकी कुणीही बोलत नाही. ते केवळ राजकारण करत आहेत. आम्हाला या राजकारणात रस नाही. आम्ही लोकांची सेवा करायला राजकारणात आलो आहे. ते करत राहू,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

“अजित पवार मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हणाले. त्यांचे बॅनरही लागलेआहेत. मध्यंतरी त्यांची जोरदार चर्चा होती”, असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मी त्यावर काहीच बोलू शकत नाही.”

“घोटाळेबाज गद्दारांना भाजपा महाराष्ट्रात पाठबळ का देत आहे?”

“माझा भाजपाला सवाल आहे की, अशा घोटाळेबाज गद्दारांना भाजपा महाराष्ट्रात पाठबळ का देत आहे? भाजपा इतर राज्यात प्रचार करते की, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही. मग या महाराष्ट्रावर भाजपाचा इतका राग का? ज्यांनी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी घोटाळा केला त्या गद्दारांना का पाठिंबा दिला?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

Story img Loader