मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात आज आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. राज्यातील शिंदे सरकार केवळ कंत्राटदारांना फायदा व्हावा या एकमेव हेतून काम करते आहे, असे ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची लोकायुक्तांबाबत चौकशी करावी, अशी मागणीही राज्यपालांकडे केल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी उद्याच निकाल येणार, माहिती देत स्वतः सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

Mumbais dabbawalas are angry with Uddhav Thackeray He did not fulfill promises made
मुंबईचे डबेवाले उद्धव ठाकरेंवर नाराज? दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
लाडक्या बहिणींची महायुतीकडून फसवणूक; दिलेली मते परत घेणार का, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Devendra Fadnavis
Maharashtra News Updates : आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार भाषण, सुरेश धस यांना दिली भगीरथाची उपमा
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
navi mumbai municipal corporation beggars loksatta news
नवी मुंबई : शहरात भिकाऱ्यांचा उपद्रव; पालिका, पोलीस प्रशासन उदासीन
Bmc to buy dust control equipment
धुळीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अद्ययावत यंत्रे खरेदी करणार
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“गेल्या सहा ते सात महिन्यात आम्ही मुंबई महापालिकेतील अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत. याची माहिती आम्ही राज्यापालांना दिली आहे. मुंबई महापालिकेतील अंदाधुंद कारभार आणि राज्यातील कंत्राटदारांच्या सरकारमुळे हे घोटाळे होत आहेत. या आरोपांची लोकायुक्तामार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे केली आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – VIDEO: “सर्वोच्च न्यायालय ‘हा’ निर्णय देणार आहे, तुम्ही लंडन दौऱ्यावर…”; संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप

“काही दिवसांपूर्वीच आम्ही महापालिकेतील सहा हजार कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा उघडकीस आणला होता. यापैकी १० रस्त्यांची कामदेखील अद्याप सुरू झालेली नाहीत. गद्दार गॅंग सोडली तर सगळ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र यावर अद्यापही कारवाई झालेली नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Political Crisis: “जर आत्ता निकाल लागला नाही, तर पुन्हा…”, उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली भीती!

“रस्ते घोटाळ्याबरोबरच आम्ही खडी घोटाळा आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळाही उघडकीस आणला होता. स्ट्रीट फर्निचर घोटाळातही १६० कोटींची कामं २६३ कोटी रुपयांना दिली गेली. एकंदरीतच मिंधे सरकार केवळ कंत्राटदारांना फायदा व्हावा या एकमेव हेतून काम करते आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader