लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने तब्बल ७८ दिवसांनंतर उन्हाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधि शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. या परीक्षेत एकूण २४.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Ayurveda and Unani course admissions started
मुंबई : आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
nala sopara school girl rape case marathi news
नालासोपार्‍यातील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरण: आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
medical admission, list of medical courses,
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार, प्रवेशासाठी ३९ हजार विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम
cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधि शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) द्वितीय सत्र परीक्षा २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण २ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ७७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते आणि १ हजार ३३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

आणखी वाचा-मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या

निकाल विलंबामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत होऊन भविष्यात उच्च शिक्षण व नोकरीच्या संधींना मुकावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती. अखेर शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.