मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहुल लागली असून मुंबईत रविवारीपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली नोंदले गेले,तर सांताक्रूझ केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे १३.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. प्रथमच मुंबईत २० अंशाखाली किमान तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान रविवारच्या तुलनेत ३.५ अंशांनी कमी आहे. सांताक्रूझ येथे प्रथमच मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सांताक्रूझ केंद्रात अनकेदा किमान तापमानाचा पारा १५-१९ अंशावर पोहोचला होता‌. मात्र, कुलाबा केंद्रात संपूर्ण नोव्हेंबर महिना किमान तापमान २०-२५ अंश इतके नोंदले गेले होते. दरम्यान, या संपूर्ण आठवड्यात किमान तापमानातील घट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mumbais temperature rises weather department observes that summer is in full swing
मुंबईत उन्हाळ्याची चाहूल
maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?

हेही वाचा…मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढू लागला आहे. राज्यात किमान तापमानात घट होण्याचा आणि थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिकमध्ये सोमवारी सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल पुणे येथे १२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे १३.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा…कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचा तूर्तास प्रस्ताव नाही

कमी दाबाचे क्षेत्र होणार ठळक

विषुवृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली आज ठळक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे‌. हे प्रणाली बुधवारपर्यंत तामिळनाडू आणि श्रीलंका किनाऱ्याकडे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Story img Loader