शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनधन खात्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. तसेच ६० टक्के लोकांची जनधन खाती बँकेत उघडताना मोदींनी पैसे भरले होते का, असा प्रश्न विचारला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) नवी मुंबईत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आले असताना पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

मोदी सरकारच्या जनधन खाते योजनेवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “६० टक्के लोकांची बँकेत खाती उघडली म्हणजे मोदींनी स्वतःच्या पैशाने ही खाती उघडली का? जनतेने स्वतःच्या पैशातून ही जनधन खाती उघडली आहेत. आज जनधन खात्याची स्थिती काय आहे. हा पैसा कोण वापरतो आहे. या खात्याचा जनतेला फायदा काय.”

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
MP Rahul Shewale defamation case Uddhav Thackeray Sanjay Raut defamation case
खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
eknath shinde on one nation one election
CM Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या निर्णयामुळे…”
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

“खातं उघडलं म्हणजे चंद्रावर फार मोठे दिवे लावले की काय”

“खातं उघडलं म्हणजे त्यांनी चंद्रावर फार मोठे दिवे लावले की काय. उलट त्यांनी जनतेला या खात्यावर १५ लाख रुपये टाकू. या आश्वासनाचं काय झालं याचं उत्तर अमित शाहांनी द्यावं. होते त्याचे काय झाले?” असा प्रश्नही अंबादास दानवेंनी विचारला.

व्हिडीओ पाहा :

“रात्री बेरात्री बैठका घेणारे गद्दार”

अंबादास दानवे म्हणाले, “रात्री बेरात्री बैठका घेणारे गद्दार लोक आहेत. त्यांच्याविषयी गणरायासमोर जास्त बोलू नये. गणराया योग्यप्रकारे सोंड फिरवेल आणि गद्दारांना धडा शिकवेल.”

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

“नवी मुंबईतील अनेक डोंगर लोकांनी खोदले”

“पर्यावरणाच्या रक्षणासाठी असे देखावे साकारणे गरजेचे आहे. मुंबई नवी मुंबईतील पर्यावरण हा मोठा प्रश्न आहे. नवी मुंबईतील अनेक डोंगर लोकांनी खोदले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पर्यावरण जपण्याची गरज आहे,” असंही मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलं.