मुंबई: गरीबांची यंदाची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे फडणवीस सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी नाममात्र दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याचा निर्णय घेतला होता. रेशन दुकानांवर राज्य सरकारच्यावतीने आनंदाचा शिधा अशी जाहिरात करणारे फलकही झळकवण्यात आले आहेत. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी दुकानांमध्ये अद्याप या वस्तू उपलब्ध न झालेल्या नाहीत.

हेही वाचा >>> ‘लम्पी’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली करणार का?; उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Pune Municipal Corporation , Tax , Elections ,
पुणेकर झाले खूश, यंदा करवाढ नाही!
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच रेशन दुकानांवर शिधा देण्याची घोषणा केली. दारिद्रय रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल या वस्तू प्रत्येक एक किलो देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी या योजनेतील धान्य व साहित्य दुकानदारांना अद्याप मिळाले नसल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. रेशन दुकानांच्या दर्शनी भागात सरकारच्या या योजनेची जाहिरात करणारे फलक लावण्यात आले आहेत. आनंदाचा शिधा असे नाव देऊन ही जाहिरात करण्यात आली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही ठिकाणी रेशन दुकानांवर जाऊन या योजनेची पाहणी केली. एका दुकानातील दुकानदारांकडून माहिती घेतानाची ध्वनिचित्रफित पेडणेकर यांनी समाजमाध्यमांवर टाकली आहे.

हेही वाचा >>> आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून अभिनेता सचिन जोशी दोषमुक्त

जाहिरात केल्यामुळे नागरिक दुकानावर सामान घेण्यासाठी येत आहेत. मात्र सामानच नसल्यामुळे लोकांना तोंड देताना आमच्या नाकीनऊ येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. या सामानाची आगाऊ रक्कम आमच्याकडून घेतली आहे मात्र सामान कधी मिळणार याबाबत कोणीही काही सांगत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. तसेच रवा, चणाडाळ, साखर या सामानाच्या पन्नास किलोच्या गोण्या येणार असून लोकांना आम्ही एक एक किलोचे वाटप करायचे आहे मग त्यासाठी पिशव्या कुठून आणायच्या असाही प्रश्नही दुकानदारांनी उपस्थित केल्याचे या ध्वनिचित्रफितीत दिसत आहे.

Story img Loader