संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. ते मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

हेही वाचा – “भाजपाने काही पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
loksatta readers response
लोकमानस : भारतालाही फटका बसण्याची शक्यता
Sanjay Raut
Sanjay Raut : “उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका”, शिवसेनेच्या मंत्र्याचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
Uddhav thackeray amit shah saif ali khan attacker
“ही देशाच्या गृहमंत्र्यांसाठी शरमेची बाब”, सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर असल्याचं समजताच ठाकरे गटाचा हल्लाबोल

काय म्हणाले आशिष शेलार?

स्वप्नील सावरकरांनी आताच उदय निरगुडकरांचा परिचय करून देताना म्हटले की, ‘ज्यांच्या आजोबांचा सावरकांशी परिचय होता, त्या नातवाने सावरकरांवर पुस्तक लिहिलं ते निरगुडकर कुठं आणि दुसरीकडे ज्यांच्या आजोबांनी सावकरांचा अपमान केला म्हणून मणिशंकर अय्यर यांना जोडे हाणले, ते आदित्य ठाकरे कुठं’. त्यामुळेच मला निरगुडकर श्रेष्ठ वाटतात. निरगुडकरांनी घेतलेल्या भूमिकेचा व्यक्तीच्या माध्यमातून परिचय करून द्यायचा असेल, तर त्यांनी महाभारतातल्या संजयची भूमिका पार पाडली आहे, असं मी म्हणेल. पण आजकाल संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो. मी सर्वच संजय बद्दल बोलत नाही. सकाळी साडेनऊ वाजता येणाऱ्या संजय बद्दल बोलतोय, अशी खोचक टीक आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा – “अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या…”, ठाकरे गटाचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र; ‘त्या’ फोटोवरून लगावला टोला!

दरम्यान, सकाळच्या पत्रकार परिषदेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल संजय राऊतांना टोला लगावला. गुरुवारी माध्यमांशी बोलताना, राजकारणातील कटुता संपवायची असेल तर संजय राऊतांनी सकाळचे अभंग बंद करायला हवे, तरच राज्यातील राज्यातील राजकीय वातावरण शुद्ध होईल, असे ते म्हणाले होते.

Story img Loader