मुंबई : वर्सोवा परिसरातील कोळीवाड्यातील रहिवाशांच्या समस्या गेली कित्येक वर्षे तशाच आहेत. या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोळीवाडा ही वर्सोवाची ओळख असली तरी या भागात मासेमारीसाठी चांगली जेट्टी नसल्याने अडचणींत भर पडली आहे.

मढ ते वर्सोवा या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल उभारण्याची मागणी येथील मच्छीमांरांनी वारंवार केली. मढ – वर्सोवा पुलामुळे या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणारा थेट मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगराला एक मोठा पर्यायी रस्ता मिळेल. सध्या या मार्गासाठी थेट मार्ग नसल्यामुळे तब्बल २२ किमीचा मोठा वळसा घालून जावे लागते. तसेच पावसाळ्यात ही बोट सेवा बंद ठेवावी लागते. त्यामुळे दोन किनाऱ्यांना जोडणाऱ्या मार्गाची गरज आहे. तसेच मासे विक्रीसाठी हा थेट मार्ग उपलब्ध होऊ शकेल, असे मच्छीमार संघटनेचे प्रतिनिधी संतोष कोळी म्हणाले.

Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
dhule police alerted after sexual abuse case increased in country and state
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धुळ्यातील सर्व ठाण्यांमध्ये आता पोलीस दादा, पोलीस दीदी
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Symbolic shutdown of food grain traders tomorrow wholesale and retail markets across the state closed
अन्नधान्य व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद, राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक

हेही वाचा – परिवहन विभागात घोटाळा, ‘अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी

डिझेलच्या परताव्यांना विलंब

  • सर्वच कोळीवाड्यांचे प्रश्न सारखे असून त्याकरीता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीची गरज
  • कोळीवाड्यांचा विस्तार करण्याची गरज आहे. कोळीवाड्यांमध्ये अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या मच्छीमार कुटुंबांची संख्या वाढली आहे. असे असताना त्यांना नवीन घरे बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही.
  • मच्छीमार समाजाला दिले जाणारे डिझेलचे परतावे वेळेवर मिळत नाहीत.
  • समुद्रालगतच्या दिव्यांमुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी अतिरिक्त डिझेल लागते. मच्छीमारांना मासेमारीसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलचा परतावा उशिरा मिळतो.

हेही वाचा – मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

मासेमारी करून आलेल्या बोटींना मासे उतरवण्यासाठी चांगली जेट्टी आणि अन्य सोयी-सुविधाही उपलब्ध नसल्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. – राजेश शेट्ये, लोकप्रतिनिधी