मुंबई : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाद्रे-वरळी सागरीसेतूवरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांचालकांकडून टोल वसूल करण्यासाठी अखेर नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली असून नव्या कंत्राटदाराने टोल वसुलीला सुरुवात केली. फेरनिविदांच्या विरोधात दाखल याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सागरीसेतूवरील टोल वसुलीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा.. प्रभावी नेतेमंडळी वाहतूक कोंडीत अडकल्यावरच रस्त्यांची कामे मार्गी!

व्यक्तिवेध: एस. राधाकृष्णन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Woman dressed as mermaid dancing Inside water tried to eaten by giant fish shocking video
बापरे! महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्…VIDEO पाहून धक्का बसेल
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Bandra Worli sea bridge coastal raod will be inaugurated by CM Fadnavis on Republic Day
सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार, सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
Thane Municipal Corporation has issued a notice to shopkeepers in Kopri to keep chicken and mutton shops closed till February 5
कोपरीत ५ फेब्रुवारीपर्यंत चिकन, मटन विक्री दुकाने राहणार बंद; ठाणे महापालिकेने दिली दुकानदारांना नोटीस

सागरीसेतू सेवेत दाखल झाल्यापासून टोल वसुलीचे कंत्राट एमईपी कंपनीला देण्यात आले होते. तीन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात येत होते. या कंत्राटाचा कालावधी ३० जानेवारी २०२० रोजी संपुष्टात आला. त्यामुळे एमएसआरडीसीने नव्या कंत्राटदाराची १९ वर्षांसाठी नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रद्द करण्या आली. त्यानंतर फेरनिविदा मागविण्यात आल्या. फेरनिविदांमध्ये कंत्राटदाराची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्याची अट घालण्यात आली होती. एमईपी आणि अन्य एका कंपनीने याविरोधात न्यायालयात धाव घेतली. परिणामी, फेरनिविदा प्रकरण न्यायप्रवीष्ट झाले. न्यायालयाने गेल्या आठवड्यात याविरोधातील याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे कंत्राटाला अंतिम रुप देण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

न्यायालयाच्या निकालानंतर एमएसआरडीसीने फेरनिविता प्रक्रिया पूर्ण करून टोल वसुलीसाठी रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने टोल वसुलीचे काम सुरू केल्याची माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

Story img Loader