लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज काही लोक स्ट्राईक रेटच्या गोष्टी करत आहे. त्यांच्याकडून काहीही आकडे सांगितले जात आहेत. बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने त्यांचा आणि आकडे लावण्याचा जवळचा संबंध आहे, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ठाकरे गटाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली.

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

“लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने दिल्लीश्वरांचा माज उतरवला आहे. त्यांना सत्तेचा माज चढला होता. त्यांनी सांगितलं की यावेळी त्यांना ४०० पेक्षा जास्त जागा मिळेल. ४०० पारचा नारा देऊन त्यांनी देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देश शांतता होती. कोणी भाजपाविरोधात बोलायला तयार नव्हतं. तेव्हा या दहशतीविरोधात उद्धव ठाकरेंनी आवाज उठवला होता. ‘इसबार ४०० पार नही’, तर ‘इसबार तडीपार’ असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला होता, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना तडीपार करून दाखवलं”, असं भास्कर जाधव म्हणाले.

veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खुळखुळा केला, मोदी आता ब्रांड नव्हे ब्रँडी म्हणूनच भाजपाचे लोक..”, संजय राऊतांची टोलेबाजी

नाव न घेता फडणवीसांवर टीका

पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. “काही लोक आज स्ट्राईकरेटच्या गोष्टी करत आहेत. त्यांच्याकडून काहीही आकडे सांगितले जात आहेत. खरं तर बऱ्याच वर्षांपासून त्याच्यांकडे गृहखातं असल्याने त्यांचा आकडे लावण्याचा जवळचा संबंध आहे”, असे ते म्हणाले.

भाजपाने आमच्या स्ट्राईक रेटच्या नादी लागू नये

“आज त्यांनी स्ट्राईक रेटच्या गोष्टी करू नये. २३ खासदार असतानाही या निवडणुकीत त्यांचे १७ खासदार निवडून आले. तर इंडिया आघाडीचे ३० खासदार निवडून आले. हा उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे. त्यांनी आमचे १३ खासदार चोरून नेले, तेव्हा आमच्याकडे ५ खासदार राहिले. मात्र, त्या पाच खासदारांचे ९ खासदार उद्धव ठाकरेंनी करून दाखवले. त्यामुळे आमचा २०० चा स्ट्राईक रेट आहे. भाजपाने आमच्या स्ट्राईक रेटच्या नादी लागू नये, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे”, असंही भास्कर जाधव म्हणाले.

Story img Loader