विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो ठराव चर्चेला येऊन त्यावर मतदान झालं पाहिजे, असं आमदारांचा आग्रह आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या गटात नीलन गोऱ्हे यांनी प्रवेश केल्यानंतर दरेकांनी अविश्वाचारा ठराव मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर अविश्वासाचा ठराव दाखल झाला असेल, तर ते योग्यच आहे, अशी भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.

भास्कर जाधव विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. तरुणांच्या हाताला काही लागणार नाही. महिलांना न्याय दिला जाणार नाही. लोकशाहीची बूज राखली जाणार नाही. पाशवी बहुमताच्या अहंकारातून हे कामकाज चालवलं जाईल,” अशी टीका भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे.

Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

गेल्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोक टेकवून मी पुन्हा या सभागृहात येणार नाही, असं सांगितलं होतं, असा प्रश्न विचारल्यावर भास्कर जाधव म्हणाले, “असं काही नाही, गैरसमज आहे तो. प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, पायऱ्यांना नमस्कार करून सभागृहात जातो. आजही आमचे सदस्य पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पण, आल्यावर पायऱ्यांना नमस्कार केला आणि सभागृहात गेलो. नंतर आंदोलनात सामील झालो. त्याच पद्धतीने सभागृहातील कामकाज संपल्यावर जाताना लोकशाहीच्या मंदिराला नमस्कार करतो.”

“त्यामुळे मी पुन्हा येणार नाही, असं म्हटलं नव्हते. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असेही म्हटलं नाही. मात्र, तेव्हा निषेध नोंदवला ही गोष्ट खरी आहे. मला जाणीवपूर्वक बोलू दिल जात नव्हते. यावेळीही मला बोलू दिलं जाणार नाही, असं दिसत आहे. काही लोक लोकशाहीच्या मंदिराला साष्टांग दंडवत घालतात. लोकशाहीची विटंबना करतात. त्यातील मी नाही,” असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं.

Story img Loader