लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः आरे कॉलनी येथे मंगळवारी बेस्ट बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती पाव वितरक होता. याप्रकरणी आरे सब पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वार सादिक खान हा उत्तर मुंबईतील विविध ठिकाणी पावाचे वितरण करायचा. मंगळवारी नेहमीप्रमाणे तो दुचाकीवरून आरे कॉलनीत जात असताना बेस्टने त्याच्या दुचाकीला धडक दिली. बस क्रमांक ४५२ गोरेगाव स्थानकाहून मयूर नगरकडे जात असताना हा अपघात झाला. ती बस चालक रमेश लोंढे चालवत होता. मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील रहिवासी असलेल्या खानला बसने दिलेल्या धडकेनंतर तो रस्त्यावर पडला. त्याच्या डोके बसच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. परिसरातील नागरिकांनी खानला तात्काळ रुग्णालयात नेले, परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी आणि चालकाचा जबाब नोंदवला.

accident in Goregaon, two-wheeler accident Goregaon,
गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
A survey on the use of Metro 3 by a consultancy firm in transport services Mumbai
मेट्रो ३ वापरण्यासाठी ६० टक्के मुंबईकर उत्सुक; अर्थ ग्लोबलचा अहवाल
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?