ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येतो आहे. तर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते नेते प्रसाद लाड कोटेचा यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Devendra Fadnavis , Raj Thackeray,
राजकीय भेटीगाठींनी तर्कवितर्क! मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; ठाकरे गटाचे नेतेही मुख्यमंत्र्यांकडे
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Sanjog Waghere appointed as in-charge city chief of Pimpri-Chinchwad Shiv Sena Thackeray group
पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुखपदी संजोग वाघेरे
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

हेही वाचा – महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्…

यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. “मिहीर कोटेचा यांच्या मुलूंडमधील कार्यालयावर जो हल्ला करण्यात आला, तो भ्याड हल्ला होता. यावेळी महिलांवरही हल्ला केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला करणे शिकवत नाही. संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकाराचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. असा हल्ला सहन केला जाणार नाही. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, भाजपाच्या या आरोपाला आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. “मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते पैस वाटत होते. त्याचा एक व्हिडीओसु्द्धा बाहेर आला आहे. तिथे पोलिसांना बोलवलं गेलं. मात्र, पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच अटक केली. अशाप्रकारे कारवाई होत असेल तर निवडणूक कशी लढवायची?” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Story img Loader