मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील बैठक होणार आहे त्याच  गुरुवार व शुक्रवार अशा दोन्ही दिवशी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या महायुतीची मुंबईत बैठक होणार आहे. ‘इंडिया’च्या बैठकीला शह देण्याकरिताच भाजपने ही रणनीती आखल्याचे बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बैठकीची सूत्रे शिवसेनेकडे, मसुद्याची जबाबदारी काँग्रेसवर, ‘इंडिया’ आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक

महायुतीच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी इंडिया आघाडीची मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये बैठक होत आहे. महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. यामुळेच दोन्ही दिवस मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असे बैठकांचे सत्र असेल. इंडिया आघाडीच्या बैठकीला एकतर्फी प्रसिद्धी मिळू नये तसेच इंडिया बैठकीवरून लक्ष विचलित करण्याकरिता महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या बैठकीची घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या बैठकीत राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व काही ठरावीक नेतेमंडळींना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व ४८ मतदारसंघामधील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला जाईल.

हेही वाचा >>> बैठकीची सूत्रे शिवसेनेकडे, मसुद्याची जबाबदारी काँग्रेसवर, ‘इंडिया’ आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक

महायुतीच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी इंडिया आघाडीची मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये बैठक होत आहे. महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. यामुळेच दोन्ही दिवस मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असे बैठकांचे सत्र असेल. इंडिया आघाडीच्या बैठकीला एकतर्फी प्रसिद्धी मिळू नये तसेच इंडिया बैठकीवरून लक्ष विचलित करण्याकरिता महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या बैठकीची घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या बैठकीत राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व काही ठरावीक नेतेमंडळींना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व ४८ मतदारसंघामधील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला जाईल.