मुंबई : पालघर येथील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील विस्थापित ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळण्याचा मुद्दा वर्षानुवर्ष प्रलंबित असल्यावर उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा बोट ठेवले. तसेच, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय कधी घेणार अशी विचारणा राज्य सरकारला केली. जवळपास २० वर्षांपासून तारापूर अणूऊर्जा प्रकल्प रखडलेला असून ग्रामस्थांचे हाल सुरूच आहेत. त्यामुळे, शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन नेमके कधी, केव्हा आणि कसे करणार ? हे स्पष्ट करण्याचेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले.

हेही वाचा >>> ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी २३५ झाडांवर कुऱ्हाड

China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
Health Minister prakash Abitkar Guillain Barre Syndrome Pune contaminated well water Sinhagad road
सिंहगड रस्ता परिसरातील विहिरीतील दूषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस; आरोग्यमंत्री आबिटकर यांची कबुली
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना

तत्पूर्वी, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीसमोर प्रकल्पबाधितांनी वैयक्तिकरित्या केलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला दिली. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी चार आठवड्याची मुदत देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांची ती मागणी न्यायालयाने मान्य केली. दरम्यान, प्रकल्पाबाधितांपैकी अनेकांच्या जमिनी गेल्या असून त्याबाबत केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतेही ठोस उत्तरे मिळालेले नाही. उपजिविकेशिवाय त्यांचे जगणेही असहाय्य झाले आहे. प्रशासनाने या संदर्भात समिती स्थापन नियुक्त केली आहे. मात्र, अद्याप एकच बैठक पार पडली आहे. दुसरीकडे, प्रकल्प बाधित शेकडो मच्छीमार कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यांच्या जगण्याचे काय ? केंद्र अथवा राज्य सरकारने त्यांच्या व्यवसाय आणि उपजीविकेच्या साधनांबाबत धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त याचिकाकर्त्यांसह भाजपचे माजी खासदार राम नाईक यांनी न्यायालयाकडे केली.

Story img Loader