मुंबई : पाच महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेल्याला उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला. आरोपीने एकापेक्षा अधिक महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे दाखवणारे पुरेसे उपलब्ध आहेत. त्यामुळे, त्याला अटकेपासून दिलासा देण्याचे ठोस कारण दिसून येत नाही, असे सकृतदर्शनी निरीक्षण नोंदवून न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याची अटकपूर्व जामीन देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता, आरोपीने केवळ एकापेक्षा अधिक लग्नच केलेली नाही, तर त्याला दोन मुले असल्याचेही उघड झाले आहे. मुलांच्या जन्मदाखल्यानुसार, मुलांच्या माता वेगळ्या असल्या तरी वडील एकच म्हणजे याचिकाकर्ता असल्याची बाबही न्यायालयाने त्याला दिलासा नाकारताना अधोरेखीत केली. याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याचे पुराव्यावरून सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने त्याची फेटाळताना नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा