मुंबई : औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारची ही कृती राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारी असल्याचे ताशेरेही ओढले. आरोग्य व्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, यापूर्वी मंजूर केलेला निधी पूर्णपणे का वितरित केला नाही आणि उपलब्ध झालेला निधीही पूर्णपणे का वापरला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला त्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. रुग्णालयांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी केली हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा