वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गतिमंद मुलांना त्यांच्यासाठी असलेल्या संस्थेत न ठेवणे खूप गंभीर आहे. त्यामुळे सरकारने अशा मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना आखण्याची गरज असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच सरकारकडे अशी योजना आहे का आणि नसल्यास सरकार ती करणार आहे का, असा सवाल करीत न्यायालयाने त्यावर सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
नवी मुंबई येथील गणपत कराडे यांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने ही विचारणा करीत सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. कराडे यांचा मुलगा गतिमंद असून त्याला नवी मुंबई येथील विशेष मुलांकरिता असलेल्या संस्थेने काढून टाकले. त्याला अतिरिक्त शिक्षकाची गरज असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. संस्थेतील गैरव्यवहारामुळेच हे केले गेले, असा आरोप करत कराडे यांनी त्या विरोधात न्यायालयात धाव घेत चौकशीची मागणी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘१८ वर्षे वयाच्या विशेष मुलांसाठी योजना काय?’
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गतिमंद मुलांना त्यांच्यासाठी असलेल्या संस्थेत न ठेवणे खूप गंभीर आहे.
First published on: 07-07-2015 at 02:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court ask plans for 18 years old special children