अशोक अडसूळ

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु असली तरी प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या बारसूमधील कातळशिल्पांना मात्र संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. 

Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?
Madhya Pradesh liquor ban
मध्य प्रदेश सरकारचा १७ धार्मिक शहरांत दारूबंदीचा निर्णय; पण अंमलबजावणी अवघड का?
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
Mohan Yadav On MP Liquor Ban
MP Liquor Ban : मध्य प्रदेशातील धार्मिक क्षेत्र असलेल्या १७ शहरात मद्यविक्रीस बंदी, मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मोठा निर्णय
guillain barre syndrome patients pune municipal corporation report survey
‘ त्या ‘ गावांना शुद्ध पाणी पुरविणे गरजेचे, काय म्हंटले नक्की महापालिकेच्या अहवालामध्ये ?
Khadakwasla, Kirkatwadi water purification, pune health department
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १७०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध रत्नागिरीच्या ‘निसर्गयात्री’ संस्थेनेला लावला आहे. या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे.

अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे. 

बारसूचा प्रस्ताव का गुंडाळला?

बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

कोकणातील १७ कातळशिल्पांच्या जतनासाठी सरकारने ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पावसाळा संपला की त्याभोवती कठडे बांधणे व इतर सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. आम्ही सर्व १७ कातळशिल्पांना संरक्षक स्मारक म्हणुन दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

– डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये

कशेळी कातळशिल्पाची वैशिष्टय़े

  • रत्नागिरीपासून ३० किमीवर राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या सडय़ावर असलेले हे कातळशिल्प मध्याश्मयुगीन आहे.
  • देशातील कातळशिल्पापैकी हे सर्वात मोठे असल्याचे मानले जाते
  • १६ मीटर लांब आणि १४ मीटर रुंद हत्तीचे हे चित्र आहे. चित्रातील हत्तीचा कान ७ फूट आणि सोंड १८ फूट लांब आहे. हत्तीच्या पोटात इतर ८० चित्रे आहेत.
  • कातळशिल्पाजवळ अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत.

Story img Loader