मुंबई : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के स्वंतत्र आरक्षण देऊन ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यात आणखी १०-१२ टक्के वाढ करुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच सोडवू शकते, अशी भूमिका अन्न व नागरी पुवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मांडली. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आपली पूर्वीपासूनची मागणी अजूनही कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन, मराठवाडय़ातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची योजना, ओबीसी समाजात मराठा आरक्षणावरून उमटलेली प्रतिक्रिया आदी विषयांवर भुजबळ यांनी मनमोकळेपणे मते मांडली. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नव्हता. पुन्हा तसाच कायदा करायचा का, असा सवाल भुजबळ यांनी केला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचे कसे? मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही. पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सुरुवातीला मराठा आरक्षणाचा कायदा मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला. आरक्षण देता येऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे.

Best Speech Award by President Draupadi Murmu
महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन; विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात मार्गदर्शन
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
agricultural schemes
कृषिक्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
supriya sule
‘निती, नियम निकष ..’ खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘ ते ‘ ट्वीट चर्चेत !
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज

हेही वाचा >>> Maratha reservation: जरांगेंचे उपोषण सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा

परंतु हा कायदा पुढे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. त्यात नेमक्या काय त्रुटी राहिल्या, याचा अभ्यास करुन पुन्हा न्यायालयात जाऊन हा प्रश्न मार्गी लावता येईल. दुसरीकडे केंद्र सराकरने आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर टिकली होती. आरक्षणात आणखी १०-१२ टक्के वाढ करुन तेवढे आरक्षण मराठा समाजाला देता येऊ शकते. हे फक्त केंद्र सरकारच करु शकते, असे ठाम मत भुजबळ यांनी मांडले. शासकीय नोकऱ्या व शिक्षणातील प्रवेश यासाठी मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, त्याचे समर्थन करताना या समाजाला पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तांत्रिक बाबी…”

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात वाटेकरी करण्यास भुजबळांनी विरोध दर्शविला. ओबीसी समाजाला ३० टक्के आरक्षण असले तरी त्यात अनेक वाटेकरी आहेत. त्यातून मूळ ओबीसींना १७ टक्केच आरक्षण मिळते. त्यात मराठा समाजाला समाविष्ट केले तर ओबीसींमधील लहान जाती आहेत त्यांना काही मिळणार नाही आणि मराठा समाजालाही त्याचा लाभ होणार नाही, असे ते म्हणाले.

जातनिहाय जनगणना आवश्यकच 

सर्व समाजांचे आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला. या आधीपासून आपण केंद्र सरकारकडे तशी मागणी केली आहे. जातीनिहाय जनगणना केली तर, कोणाची किती लोकसंख्या आहे ते कळेल. बिहार व इतर काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ओबीसींतर्गत वर्गीकरणाबाबत रोहिणे आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे, त्याबाबत विचारले असता, आधी ओबीसींना सर्व राज्यांत २७ टक्के पूर्ण आरक्षण तरी द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. जालन्यातील लाठीमारप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वातावरण शांत व्हावे या उद्देशाने माफी मागितली. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून क्षमायाचना करण्यात काहीच वावगे वाटत नाही, असेही भुजबळ म्हणाले.

आरक्षण ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे

वेगवेगळय़ा समाज घटकांककडून आरक्षणाची मागणी होत आहे. परंतु आरक्षण हा काही ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही. हजारो वर्षे जे दबले-दडपले गेले होते, त्यांना समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे, अशी सुस्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.