मुंबई : केंद्र सरकारच्या परिवहन व रस्ते वाहतूक विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार १५ वर्षे जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. देशातील १५ वर्षे जुन्या सर्व रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक यांसह सर्वसामान्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुनर्नोंदणीच्या शुल्कात वाढ झाली असून ८ हजारांच्या पुनर्नोंदणी शुल्कासाठी आता १२ ते १८ हजार रुपये मोजावे लागणार आहे. या शुल्कवाढीला महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेद्वारे तीव्र विरोध करण्यात आला आहे.

सध्या देशातील वाहतूकदारांवर विविध प्रकाराचे कर लावलेले आहेत. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. देशात महत्त्वाची शहरे वगळता बहुसंख्य ठिकाणी १५ वर्षांवरील वाहने स्थानिक ठिकाणी वापरली जातात. अनेकजण या वाहनांचा आपल्या व्यवसायासाठी वापर करतात. त्यामुळे या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मध्यम वाहनांची पुनर्नोंदणी करण्यासाठी सुमारे ८ हजार रुपये आकारले जात होते.

customs officials seized five Siamang gibbons at mumbai airport returning two to indonesia
सियामंग गिबन्सची मायदेशी रवाना
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Germen Bakery News
German Bakery : पुण्यातील जर्मन बेकरीच्या मालकिणीने सांगितली नकोशी आठवण, “१५ वर्षांपूर्वीचा तो दिवस…”
stock market crash
Why market is falling today: सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी गायब, बाजार कोसळण्याची काय कारणं आहेत?
wrong-side driving, tire killer, experiments ,
विश्लेषण : राँग-साइड जाणाऱ्या वाहनचालकांवर अक्सीर इलाज… काय आहे ‘टायर किलर’? ठाण्यासारखे प्रयोग इतरत्रही होतील?
Mumbai Jogeshwari Oshiwara Furniture Market Fire
Oshiwara Furniture Market Fire : मुंबईत जोगेश्वरी येथे फर्निचर मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना
Maghi Purnima Snan Maha Kumbh 2025 New Traffic Rules
Maha Kumbh 2025 New Traffic Rules : महाकुंभ येथे ‘महाजाम’, बॉर्डरवर अघोषित आणीबाणी; नव्या ट्रॅफिक नियमांमुळे प्रयागराजहून भाविकांना किती किमी चालावं लागणार?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

केंद्र सरकारने पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकारने वाढवलेल्या या प्रचंड शुल्काचा विरोध आहे. लवकरच देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने याचा पुनर्विचार करावा, अन्यथा देशव्यापी चक्काजाम करण्यात येईल. १५ वर्षांवरील सर्व जुन्या प्रकारची वाहने भंगारात काढण्यासाठी आणि वाहने बनविणाऱ्या कंपन्यांना फायदा होण्यासाठी भरमसाठ शुल्कवाढ केली आहे, असे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader