प्रसाद रावकर
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून होणाऱ्या वायुगळतीमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अन्य कारणांच्या तुलनेत गॅस सिलिंडर गळतीमुळे लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांची संख्या कमी असली तरी मृत आणि जखमींची संख्या मात्र वाढत आहे. परिणामी, अग्निशमन दलासमोर आणखी एक नवे आव्हान उभे राहिले असून जनजागृतीच्या माध्यमातून गॅस सिलिंडरच्या गळतीतून आग लागण्याच्या दुर्घटना टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या सहा वर्षांमध्ये मुंबईत २६ हजार ८५५ आगीच्या दुर्घटना घडल्या. त्यापैकी २० हजार ९ आगीच्या दुर्घटना सदोष विद्युत प्रणालीमुळे घडल्याचा निष्कर्ष दुर्घटनांच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आला आहे. तसेच उर्वरित ६८४ आगीच्या दुर्घटना निरनिराळय़ा कारणांमुळे झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या सहा वर्षांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे ३३२ घटना घडल्या. या दुर्घटनांमुळे संबंधित कुटुंबालाच नव्हे तर शेजारच्या रहिवाशांनाही धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सहा वर्षांतील गॅस सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनांची संख्या तुलनेत कमी असली तरीही मृत आणि जखमींची संख्या वाढती आहे. गॅस सिलिंडर गळतीमुळे २०१६-१७ या वर्षांमध्ये ६६ ठिकाणी आगी लागल्या होत्या. मात्र २०२१-२२ मध्ये याच कारणामुळे ७३ ठिकाणी आगी लागल्या. त्यात २० पुरुष आणि २२ महिला असे एकूण ४२ जण जखमी झाले, तर ११ पुरुष आणि तीन महिला अशा एकूण १४ जणांना प्राण गमवावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडर गळतीमुळे लागणाऱ्या आगीतील मृत आणि जखमींची संख्या वाढू लागली आहे. जनजागृतीद्वारे अशा दुर्घटनांची तीव्रता कमी करण्याचा संकल्प अग्निशमन दलाने सोडला आहे.
गॅस सिलिंडर गळतीमुळे वाढत्या आगीच्या घटनांचे आव्हान
तुलनेत कमी असली तरीही मृत आणि जखमींची संख्या वाढती आहे. गॅस सिलिंडर गळतीमुळे २०१६-१७ या वर्षांमध्ये ६६ ठिकाणी आगी लागल्या होत्या. त्यात दोन पुरुष आणि एक महिला असे तिघे जखमी झाले होते. एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मात्र २०२१-२२ मध्ये याच कारणामुळे ७३ ठिकाणी आगी लागल्या. त्यात २० पुरुष आणि २२ महिला असे एकूण ४२ जण जखमी झाले, तर ११ पुरुष आणि तीन महिला अशा एकूण १४ जणांना प्राण गमवावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडर गळतीमुळे लागणाऱ्या आगीतील मृत आणि जखमींची संख्या वाढू लागली आहे. ही चिंतेची बाब असून जनजागृतीच्या माध्यमातून अशा दुर्घटनांची तीव्रता कमी करण्याचा संकल्प अग्निशमन दलाने सोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅसगळतीमुळे आग लागल्यास

  • जाडसर कपडा ओला करून सिलिंडरच्या रेग्युलेटरभोवती गुंडाळावा.
  • शक्य असल्यास रेग्युलेटर बंद करावा.
  • तात्काळ अग्निशमन दल, संबंधित गॅस कंपनीला कळवावे.
  • मुख्य विद्युत प्रवाह बंद करावा.
  • आगीची माहिती शेजाऱ्यांना देऊन सर्वानी विलंब न करता सुरक्षित स्थळी जावे.
    स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला हवी. तरच अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील. – हेमंत परब, प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल
    गॅस गळती झाल्यास..
    • विद्युत उपकरणांची बटणे चालू अथवा बंद करू नये.
    • तात्काळ अग्निशमन दल व संबंधित गॅस कंपनीला कळवावे.
    • सिलेंडरचा रेग्युलेटर तात्काळ बंद करावा.
    • सर्व खिडक्या, दरवाजे उघडून वायुविजन करावे.
    • सिलिंडरमधून गॅस गळती होताना जळत्या वस्तू जवळ आणू नये.
    • सिलिंडरची कॅप बसवून तो खुल्या मैदानात न्यावा.
    • सिलिंडरसंबंधित कंपनीच्या ताब्यात द्यावा.
    जोडणी-हाताळणी सुरक्षा
    • गॅस सिलिंडरची मुदत संपण्याची तारीख तपासून घ्यावी.
    • गॅस सिलिंडर घरी येताच त्यातून गळती होत नसल्याची खात्री करून घ्यावी.
    • गॅस सिलिंडर ज्वलनशील पदार्थाजवळ ठेवू नये.
    • हवेशील ठिकाणी उभ्या स्थितीत सिलिंडर ठेवावा.
    • गॅस रेग्युलेटर व्यवस्थित जोडल्याची खात्री करावी.
    • जोडणीसाठी आयएसआय प्रमाणीत नारंगी सुरक्षा पाईप वापरावा.
    • सुरक्षा पाईपला एकापेक्षा अधिक शेगडय़ा जोडू नये.
    • वापर होत नसल्यास गॅस रेग्युलेटर नियमित बंद करावा.