मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात बुधवारी तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. मात्र हवेतील उष्मा कायम राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेले दोन दिवस कडक ऊन आणि उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. तापमानाचा पारा बुधवारी कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, आज आणि उद्या तापमानात घट झाली तरी हवेतील उष्मा कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
Increase in honorarium of women who provide information about illegal abortions say Prakash Abitkar
अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ – आबिटकर
MMRDA, third Mumbai, land acquisition, farmers,
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात
Sludge, dam, silt , nashik district, campaign,
नाशिक : फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहीम

हेही वाचा – करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे

हेही वाचा – मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

आर्द्रता अधिक असल्यामुळे मुंबईकरांना बुधवारी उष्मा सहन करावा लागला. मात्र, दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाचा तडाखा कमी जाणवला. दरम्यान, आज मुंबई, ठाणे जिल्ह्यांसह सिंधुदुर्गमध्येही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वातावरणात अधिक आर्द्रता जाणवेल.

Story img Loader