मराठी भाषिकांना वैचारिक खाद्य पुरवण्यात अग्रेसर ‘लोकसत्ता’तर्फे आणखी एक पुष्प सादर होणार आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘लोकसत्ता लेक्चर’ हा उपक्रम सुरू होत असून, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे या व्याख्यान परंपरेचे पहिले मानकरी होणार आहेत. हा कार्यक्रम ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह असणार आहे. संध्याकाळी ४.३० वाजल्यापासून लोकसत्ताच्या प्रेक्षकांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे विचार ऐकता येतील.

‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’ (अंडरस्टॅण्डिंग फेडरलिझम अॅण्ड इट्स पोटेन्शियल) या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानातून संघराज्य रचनेवर केले जाणारे भाष्य अतिशय महत्त्वपूर्ण विचारमंथन ठरणार आहे.

cji dhananjay chandrachud lecture in loksatta lecture a new initiative
लोकसत्ता लेक्चर’ : नवा उपक्रम: न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने ‘विचारोत्सवा’ची नांदी’
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
supreme court says secularism a core part of constitution
धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा भाग! प्रास्ताविकेत शब्दांच्या समावेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
will Mahavikas Aghadi hit by Maratha Shakti experiment in 120 constituencies in assembly election
१२० मतदारसंघांत ‘मराठा शक्ती’च्या जरांगे प्रयोगाचा महाविकास आघाडीला फटका?
Uddhav Thackeray believes that the Maha Vikas Aghadi government is certain in the state of Maharashtra
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित, उद्धव ठाकरे यांना ठाम विश्वास; राजन तेली यांचा पक्षात प्रवेश
Bhagwant mann
प्रदुषणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “ते युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, मग…”
The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
Chandrashekhar Bawankule, Candidates, merit,
बावनकुळे म्हणाले, उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर….

या लिंकवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ‘लोकसत्ता लेक्चर’ हा कार्यक्रम पाहता येईल.

सर्वोच्च न्यायालयाला ‘संविधानाचे राखणदार’ म्हटले जाते, कारण संविधानाचा अर्थ लावणे आणि प्रसंगी बेबंद राजकारणापासून देशाला वाचवण्यासाठी संविधानाचा आसूडही (रिट) उगारणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कर्तव्य.

राज्यपालांना त्यांच्या अधिकारांप्रमाणेच मर्यादांचीही जाणीव देऊन, केंद्राने राज्यांवर लादलेले निर्णय रद्द करून तसेच कोणते कर आकारण्याचा अधिकार राज्यांनाच आहे हे वेळोवेळी सकारण स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने संविधानाला अपेक्षित असलेल्या केंद्र-राज्य संबंधातील समतोलाचेही रक्षण केलेले आहे.

सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांच्या कारकीर्दीत चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. संविधानाचा अमृतमहोत्सवी क्षण महिन्याभरावर आलेला असताना लोकसत्ताच्या वाचकांना, प्रेक्षकांना चंद्रचूड यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.