मुंबई : लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार या विरोधकांच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले. पण आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ती चूक करणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत मराठा, आोबीसी, दलित, आदिवासी महायुतीच्या पाठीशा उभे राहतील आणि महायुतीचा भगवा झेंजा पुन्हा विधान भवनावर फडकेल, असा दावा केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यातच निम्मा वेळ खर्च केला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांच्या जोरावर ९ जागा जिंकल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

दोन लाख मते जादा

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा आपल्या शिवसेनेला राज्यात दोन लाख जादा मते पडली आहेत. समोरासमोर तेरा मतदारसंघात झालेल्या लढतीत आम्ही ७ जागा जिंकून ठाकरे सेनेवर मात दिली आहे. कोकण, ठाणे, संभाजीनगर असे पारंपारिक बालेकिल्लेही आम्हीच सर केल्याने खरी शिवसेना ही कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.

Archana Patil Chakurkar
अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Haryana Assembly Election 2024
Haryana Assembly Election 2024: हरियाणाच्या निवडणुकीत भाजपाने माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना बाजूला का केलं? काय आहे राजकीय गणित?
People unhappy with Ajit Pawar Shivsena demand to leave seat so that one MLA of Mahayuti will not reduced
अजितदादांच्या आमदाराबाबत जनतेत नाराजी, महायुतीचा एक आमदार कमी होऊ नये यासाठी जागा सोडा; शिवसेनेची मागणी
minister abdul sattar supporters protest agains raosaheb danve for pakistan remark on sillod
मंत्री सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Arvind Kejriwal latest marathi news
विश्लेषण: केजरीवाल यांच्या घोषणेने भाजपची अडचण? मुदतपूर्व निवडणुकीमागे आत्मविश्वास की जुगार?

हेही वाचा >>>बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा होणार ? सीईटी कक्षाकडून सरकारकडे विचारणा

ठाणे, कोकण, संभाजीनगर हे बालेकिल्ले आपण अबाधित ठेवले. ठाणे, कल्याण लोकसभा तर दोन दोन लाखांच्या फरकाने जिंकली. कोकणात एकही जागा ठाकरे गटाला मिळाली नाही. या निकालांनी दोन वर्षापूर्वी आपण केलेला उठाव हा योग्य होता यावर जनतेनेच शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे खरी शिवसेना आपलीच आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा टोला शिंदेंनी लगावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार कसे जिंकले ते महाराष्ट्राला माहीत आहे. पण ही तात्पुरती आलेली सूज आहे. एकनाथ शिंदे संपणार , शिवसेना संपणार म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले. एकनाथ शिंदे शिवसैनिक आणि जनतेच्या साथीने जिंकला. हा शिंदे संपणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि दिघेंचा चेला. जनतेचा माझ्यावर प्रेम आहे. देशात जे धाडस कोणी केले नाही ते मी करून दाखविले. भीती माझ्या रक्तात नाही. राजकीय पंडित एक दोन जागा येतील सांगत होते. ठाणे जाईल सांगत होते. पण जनतेेने आम्हालाच कौल दिला, असेही शिंदे म्हणाले.