मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान होतील आणि काँग्रेस व इंडिया आघाडीचे पानिपत होईल, हेच चार राज्यांच्या निवडणूक निकालांनी अधोरेखित केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, मोदी यांची लोकप्रियता, करिष्मा व देशाभिमान, गृहमंत्री अमित शहा यांचे नियोजन यामुळे एनडीएला  यश मिळाले. हर घर मोदी, असे आधी म्हटले जात होते, आता प्रत्येक मनात मोदी (हर मन मोदी) असे चित्र आहे. मोदी यांच्या बदनामीचे षडयंत्र आखले गेले, विरोधकांकडून अनेक आरोप झाले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली व परदेशात जाऊन भारत तोडो, असे आरोप केले. पण जनता ही देशावर प्रेम करते व तिला सर्व काही समजते. मोदी यांनी देशाचा लौकिक जगभरात वाढविला आहे. त्यामुळे जनतेने मोदींनाच भरभरून कौल दिला आहे आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असफल ठरली आहे.

CM Eknath Shinde claims that there is no dissatisfaction in allocation of seats in mahayuti
महायुतीत जागा वाटपात नाराजी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Congress leaders in Nagpur claimed that state president Nana Patole will be the next chief minister
“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
minister abdul sattar supporters protest agains raosaheb danve for pakistan remark on sillod
मंत्री सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?

हेही वाचा >>> हिंदी’ पट्टय़ात भाजप भक्कम, काँग्रेसला दक्षिणेचा हात

आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज दहा दिवसात माफ करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत दिले होते. पण पाच वर्षांत काहीच केले नाही. कर्नाटकमध्येही निवडणुकीत अनेक आश्वासने दिली. पण नंतर राज्य सरकारकडे ती पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याची कारणे देण्यात येत आहेत. पण पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वसामान्यांची काळजी घेत असून जनतेला सर्व समजते. त्यामुळे जनता मोदींच्या पाठीशी असून त्यांचे कर्तृत्व शिखरावर असल्याचे सिद्ध झाले आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.