मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांत गुरुवारी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असली, तरी पावसाने हवामान विभागाचे अंदाज वारंवार चुकविले. गुरुवारी सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज असताना मुंबईकरांना ‘कोसळधारां’चा अनुभव आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीचा ‘सुधारित’ अंदाज जाहीर होताच पावसाचा जोर ओसरला. हवामान विभागाच्या या फसलेल्या इशाऱ्यांमुळे नागरिक आणि यंत्रणांची पुन्हा एकदा फसगत केली.

मुंबईत जून महिन्यात मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून हवामान विभागाने मुंबई संदर्भात दिलेले पावसाचे बहुतांश अंदाज व इशारे हे प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत ठरले. मुंबईत बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात दिवसभरात कुलाबा येथे केवळ २.५ मिमी तर सांताक्रूझ येथे ६.९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर गुरुवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचे भाकीत करण्यात आले. प्रत्यक्षात पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरांत अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसाने मुंबईची पुरती ‘तुंबई’ झाल्यानंतर हवामान विभागाने दुपारी १ च्या सुमारास मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला. मात्र हा इशारा दिल्यानंतर लागलीच पावसाचा जोर ओसरल्याचा अनुभव आला.

lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
Loksatta samorchya bakawarun February 1st upcoming budget
समोरच्या बाकावरून: दिल्लीतील कुजबुज असे सांगते की…
Chikungunya threat increases Number of patients doubles across the state Pune print news
चिकुनगुनियाच्या धोक्यात वाढ; राज्यभरात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ
climate change loksatta
कुतूहल : भूजल आणि हवामानबदल
Maharashtra Pollution Control Board takes action due to noise pollution caused by Reliance Jio company office 
बड्या दूरसंचार कंपनीला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल
India Meteorological Department completed 150 years
भारतीय हवामानशास्त्र विभागाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वाटचाल

हेही वाचा >>>मुंबई: पावसामुळे १५० हून अधिक लोकल रद्द

शाळांची तारांबळ

हवामान विभागाने गुरुवारसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला नसल्यामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यात आल्या. मात्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंदाज बदलण्यात आला व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची सूचना देण्यात आली. दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर झाली. प्रत्यक्षात दुपारनंतर पाऊस कायम असला तरी त्याचा जोर मात्र ओसरला होता.

Story img Loader