मुंबई : भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना संविधानाला अपेक्षित असलेले विचारी नागरिक घडवण्याचे आणखी एक पाऊल म्हणून ‘लोकसत्ता लेक्चर’ या उपक्रमाला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या ‘विचारोत्सवा’ची नांदी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने होत असून ‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’! (अंडरस्टॅण्डिंग फेडरलिझम अॅण्ड इट्स पोटेन्शियल) या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत.

हेही वाचा >>> बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक

cji dhananjay chandrachud lecture in loksatta lecture a new initiative
लोकसत्ता लेक्चर’ : नवा उपक्रम: न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने ‘विचारोत्सवा’ची नांदी’
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
loksatta readers feedback
लोकमानस: भाषेसाठी दाक्षिणात्य राज्यांचा आदर्श घ्या
Raj thackeray Mamledar misal, Raj thackeray Thane,
राज यांच्या ‘चवदार’ भेटीत कार्यकर्त्यांची मने मात्र कडू !
Shyam Manav, Shyam Manav Nagpur, constitution,
संविधानाचा मुद्दा, श्याम मानव अन् भाजपची राडा संस्कृती
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!

सर्वोच्च न्यायालयाला ‘संविधानाचे राखणदार’ म्हटले जाते, कारण संविधानाचा अर्थ लावणे आणि प्रसंगी बेबंद राजकारणापासून देशाला वाचवण्यासाठी संविधानाचा आसूडही (रिट) उगारणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कर्तव्य. राज्यपालांना त्यांच्या अधिकारांप्रमाणेच मर्यादांचीही जाणीव देऊन, केंद्राने राज्यांवर लादलेले निर्णय रद्द करून तसेच कोणते कर आकारण्याचा अधिकार राज्यांनाच आहे हे वेळोवेळी सकारण स्पष्ट करून सर्वोच्च  न्यायालयाने संविधानाला अपेक्षित असलेल्या केंद्र-राज्य संबंधातील समतोलाचेही रक्षण केलेले आहे. यापैकी काही निकाल उण्यापुऱ्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही दिलेले आहेत. त्यामुळेच, संविधानाचा अमृतमहोत्सवी क्षण महिन्याभरावर (२६ नोव्हेंबर) आला असताना सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानातून संघराज्य रचनेवर केले जाणारे भाष्य अतिशय महत्त्वपूर्ण विचारमंथन ठरणार आहे.