मुंबई : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून त्याला आणखी गती देण्यासाठी प्रकल्प विकासकांच्या अडचणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी नियमित आढावा बैठक घेऊन सोडवाव्यात आणि त्याचा अहवाल १५ दिवसांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिले.

प्रकल्पाच्या आढाव्यासाठी फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर संबंधित विभागांचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. हा प्रकल्प राबविताना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याने नमूद करून मुख्यमंत्री फडणीवस म्हणाले की, ‘प्रकल्पाच्या जमिनीवर अतिक्रमण असेल, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व विकासक यांची एकत्रित बैठक घेण्यात यावी आणि अतिक्रमण दूर करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांना द्यावी’.

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Appointments , members ,
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द, राणे कुटुंबीयांचे वर्चस्व
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
solar projects ajit pawar
सौर ऊर्जा प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
3000 kw of electricity generated from solar energy in raigad district
रायगड जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार किलोवॅट वीज निर्मिती

हेही वाचा…एअरगनची गोळी कुत्र्याच्या शरीरातच,निधीअभावी शस्त्रक्रिया रखडली

या प्रकल्पासाठी विकासकांना लागणाऱ्या सर्व परवानग्या ऑनलाईन देण्याचे निर्देश देऊन फडणवीस म्हणाले की, ‘ज्या अडचणी गाव व जिल्हा पातळीवर सोडविणे शक्य नसेल, त्या मंत्रालयस्तरावर सोडविल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याची काळजी प्रत्येक पातळीवर घेण्यात यावी’.

Story img Loader