मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तरवाहिनी मार्गिका आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर, सुसह्य आणि वेगवान होणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना कुटुंबियांसमवेत अधिकचा वेळ देता येणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतादेखील वाढणार आहे. तसेच, या पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे परदेशात आल्याचा भास होतो, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तरवाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात येत आहे. या पुलाच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Ravindra Dhangekar met Deputy CM Eknath Shinde sparking rumors of joining Shinde group
मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज?
Badlapur Sexual Assault Case, Akshay Shinde Encounter Case, Akshay Shinde ,
भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप
Vijay Wadettiwar alleged CM Eknath Shinde Home Minister Devendra Fadnavis and five policemen for Akshay Shindes encounter
बदलापूर बनावट चकमकीची जबाबदारी शिंदे, फडणवीसांचीही, वडेट्टीवार यांचा आरोप

हेही वाचा >>> जमिनी मोकळ्या करा!केंद्र सरकारी भूखंडांबाबत नीती आयोगाची शिफारस, सात वर्षांत ११ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आव्हान

उत्तरवाहिनी मार्गिकेकरिता किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल १५ सप्टेंबर २०२४ रोजी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने मुदतीपूर्व दोन दिवस अगोदरच हा पूल नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिला. ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्याचबरोबर वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषणातही घट होणार आहे. मुंबई प्रदूषणमुक्त करणे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून देश-विदेशातून हजारो पर्यटक मुंबईत येतात. मुंबईच्या विकासात गतीने बदल घडत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार असून त्यानंतर खड्डेमुक्त प्रवासाचा अनुभव मुंबईकर घेतील. तसेच, कोळी-आगरी बांधवांच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून किनारी रस्ता प्रकल्पाला गती दिली जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader