मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले. जयंतीच्या दिवशी पुरुष मंडळी दारू पिण्यासाठी गेल्याचा उल्लेख एका व्हायरल ध्वनिचित्रफितीतून समोर आला आहे. त्यांच्या या विधाना विरोधात जनतेने संताप व्यक्त केला आहे. या विधानाविरोधात सोमवारी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आव्हाड यांनी तत्काळ याबाबत जनतेची माफी मागावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint lodged against jitendra awad in chembur mumbai print news ysh