मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. तर प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेसाठी किमान एक – दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असताना भाजपला मात्र लोकार्पणाची घाई झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी २४ जुलै रोजी एक ट्विट करत ‘मेट्रो ३’चे लोकार्पण होणार असल्याचे जाहीर केले. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट काढून टाकले. पण त्यांच्या या ट्विटमुळे लोकार्पणावरून चांगलाच गोंधळ झाला आहे. दरम्यान, पहिला टप्पा सुरू होण्यास किमान दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा