मुंबई : निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि मोकळ्या वातावरणात तसेच निष्पक्षपातीपणे होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या झालेल्या घोळाचा ही समिती सर्वात आधी आढावा घेणार आहे.

पक्षाने निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ईगल’ हा कृती गट स्थापन केला आहे. निवडणूक आयोगाकडून मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडल्या जातात की नाही यावर हा कृती गट लक्ष ठेवणार आहे. या कृती दलात अजय माकन, दिग्विजय सिंग, अभिषेक मनू संघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिंग सप्पल, नितीन राऊत, चल्ला वनसी चांद रेड्डी या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारयाद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची समिती चौकशी करणार आहे. या समितीत राज्यातील नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
financial news loksatta
राज्य उत्पन्नाच्या प्रभावी अंदाजासाठी माहितीची गतीमान देवाणघेवाण आवश्यक, राज्य उत्पन्न सल्लागार समितीच्या बैठकीचा सूर
Dr Baba Adhav demand for strict implementation of the Constitution
राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी

‘मतदारांची संख्या वाढली कशी?’ राज्यात २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात नव्याने ३२ लाख मतदारांची नोंदणी झाली होती. पण लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ४८ लाख मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काँग्रेसने हाती घेतला आहे. अवघ्या सहा महिन्यांत ४८ लाख मतदारांची संख्या कशी वाढली, असा सवाल काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्रातील या घोळाची माहिती घेण्याबरोबरच भविष्यातील निवडणूक प्रक्रियेवरही या कृती गटाचे लक्ष राहील.

Story img Loader