राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेलं पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवलं. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, काँग्रेसनं या जीआरला तीव्र विरोध केला असून तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पदोन्नतीमधील रद्द करण्यात आलेलं आरक्षण हा मुद्दा आता सत्ताधाऱ्यांमध्येच तापला असून आघाडीतील भागीदार पक्ष या मुद्द्यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

“रिक्त पदांची तातडीने भरती करा”

UPI
UPI Rule Change : …अन्यथा १ फेब्रुवारीपासून UPI पेमेंट करता येणार नाही, करावा लागणार ‘हा’ महत्त्वाचा बदल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
aditi tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार? आदिती तटकरे म्हणाल्या, “ऑक्टोबरमध्ये…”
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
Vijay Wadettiwar on Guardian Ministers Appointment Postponement
“जिल्ह्याचं पालकत्व हवं की मलिदा?” पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांचा प्रश्न; म्हणाले, “एका रात्रीत…”
Raigad and Nashik
Guardian Minister : रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Scam in contract bus process Inquiry committee recommends to Chief Minister to cancel tender Mumbai new
एसटी बस निविदेत घोटाळा नव्याने प्रक्रिया राबविण्याची शिफारस; मुख्यमंत्र्यांचे निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यघटनेच्याच साक्षीने घेतली आहे. पण ७ मे रोजी काढलेला जीआर हा बेकायदेशीरपणे काढण्यात आला असून तो तातडीने रद्द करण्यात यावा आणि राज्यातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी”, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली आहे. याशिवाय, “२०१७पासून आधीच्या सरकाने देखील एकही आरक्षणाची जागा भरलेली नाही. यचा सगळ्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून भरण्यात याव्यात”, असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

काय आहे हा जीआर?

राज्य सरकारच्या शासकीय आणि निमशासकीय अशा पदांवर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पदोन्नतीमध्ये जातनिहाय आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पदोन्नतीमधील आरक्षणाविषयीच्या उपसमितीचे अध्यक्ष खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. या समितीने ७ मे रोजी हे आरक्षणच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या जीआरमध्ये हे आरक्षण रद्द करून पदोन्नतीचा कोटा सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात देखील आव्हान देण्यात आलं होतं.

उपसमितीलाच विश्वासात घेतलं नाही!

दरम्यान, हा जीआर काढताना यासंदर्भातल्या उपसमितीलाच विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री नितीन राऊथ यांनी केला आहे. “७ मे रोजीचा जीआर मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विश्वासात घेऊन काढण्यात आलेला नाही. मंत्रिमळाच्या बैठकीतही तो मांडलेला नाही. त्यामुळे तो आम्हाला मान्य नाही. तो रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मागितली असून ती लवकरच मिळेल अशी आम्हाला आशा आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं आह.

पदोन्नतीतील आरक्षण : काय घडलं उच्च न्यायालयात?

प्रश्न श्रेयाचा नाही, संविधानाचा आहे!

यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी काँग्रेसची बांधिलकी संविधानाशी असल्याचं नमूद केलं. “ही उपसमितीच आमच्या आग्रहाखातर तयार झाली आहे. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी यांच्या पुढाकाराने ती तयार झाली. पण उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त कोणत्याही सदस्याला मिळालेले नाही. हा अत्यंत बेकायदेशीरपणे निघाला असल्यामुळे आम्ही त्यावर दाद मागतो आहोत. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून सामाजिक बांधिकलीचा आहे. भारतीय संविधानाशी आमची बांधिलकी आहे”, असं ते म्हणाले.

Story img Loader