काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेला अर्ज आणि त्याला एका दिवसात मिळालेली माहिती यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “आम्हाला ३०-३० दिवस माहिती मिळत नाही. दुसरीकडे यांना एका दिवसात माहिती मिळते,” असा आरोप अतुल लोंढे यांनी केला. तसेच फडणवीसांनी राज्यात रोजगार आणा, विरोधी पक्षसुद्धा तुमच्यासोबत असेल, असंही नमूद केलं. ते बुधवारी (२ नोव्हेंबर) मुंबईत बोलत होते.

अतुल लोंढे म्हणाले, “३१ ऑक्टोबरला माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली जाते आणि संध्याकाळी माहिती मिळते. यात सात ते आठ विभागांचा सहभाग आहे. त्या माहिती अधिकाऱ्याला ८-१- तासात सर्व गोष्टींचं आकलन झालं का? सर्व विभागांनी एवढ्या वेळात माहिती दिली आणि यांनी माहिती अधिकार अर्जाचं उत्तर दिलं का?”

The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
bjp unexpected hat trick in haryana assembly election
विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे

“आम्हाला ३०-३० दिवस माहिती मिळत नाही”

“आम्हाला ३०-३० दिवस माहिती मिळत नाही. माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही, अशी भलती उत्तरं आम्हाला येतात. दुसरीकडे यांना एका दिवसात माहिती मिळते,” असा आरोप अतुल लोंढे यांनी केला.

“१५ जुलैची बैठक का घेतली होती”

अतुल लोंढे पुढे म्हणाले, “मी पुराव्यानिशी सांगितलं की, मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या प्रधान सचिवांना घेऊन १५ जुलैला बैठक घेतली. त्या बैठकीत पाण्याला सवलत कशी द्यायची, तीन रुपये युनिटने वीज देणे, स्टँप ड्युटी माफ करणे असे अनेक निर्णय झाले. तेव्हा कुणाचं सरकार होतं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. तेव्हा तुमचं सरकार होतं. त्यामुळे ती बैठक का घेतली होती?”

हेही वाचा : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त उद्धव ठाकरे सहभागी होणार का? अंबादास दानवे म्हणाले, “काहीही अडचण…”

“फडणवीस कालही खोटं बोलले आणि आज पुन्हा खोटं बोलले”

“कालही खोटं बोलले आणि आज पुन्हा खोटं बोलले. आपण खोटं बोलत राहिलं की मागे काय बोललो हे लक्षात राहत नाही. त्यामुळे पुन्हा खोटं बोलावं लागतं. त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्रातील तरुण आपले आहेत. इथं श्रेय घेत पक्षीय राजकारण करणं योग्य नाही. आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की रोजगार आणा, विरोधी पक्षसुद्धा तुमच्यासोबत असेल,” असंही लोंढे यांनी नमूद केलं.